रात्रीच्या शांततेत बसलेला तो विचार करत होता की ,
आयुष्य किती विचित्र आहे,
ज्या गोष्टी त्याने मनापासून जपल्या होत्या,
त्या आता त्याच्याजवळ नव्हत्या.
कधी वस्तू, कधी आठवणी, तर कधी माणसं सगळं हळूहळू हातातून निसटत गेलं.
त्याच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंना फार कमी लोक समजू शकले, कारण दुःख समजून घेण्यासाठी फक्त डोळे पुरेसे नसतात, त्यासाठी मन लागते. ज्यांना त्याच्या भावना कळल्या, त्यांनी त्याच्या वेदनेत स्वतःला पाहिलं ,त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, बाकी जग मात्र त्याच्या त्रासाकडे एक मज्जा म्हणून पाहत राहील.
पण त्या वेदनेतूनच त्याला एक नवं बळ मिळालं.
गमावलेलं परत मिळणार नव्हतं,
पण त्याने स्वतःला शिकवलं की,
जपलेल्या गोष्टी हरवल्या तरी मनातल्या आठवणी कधीच मरत नाहीत.
आणि त्या आठवणींचा आधार घेऊन तो पुन्हा उभा राहिला.
मज्जा पाहणाऱ्या जगाला दाखवून दिलं की ,
कोणतंही दुःख हे शेवट नसतं,
ते तर नव्या सुरुवातीचं बीज असतं.
फक्त थोडं धैर्य ठेवावं लागत…
कारण प्रत्येक अंधारानंतर पहाट नक्कीच उगवते. ♥️
@सोनाली कुलकर्णी
#लघुकथा #आयुष्य #गमावलेलं_परत_कधीच_मिळत_नसत #fbpost2025シ #positivethinking #motivational #fbpostviral #followersシ゚ #highlights